- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातील चौघे मित्र शहरापासून काही अंतरावर असलेल्या नदी तीरावर पोहण्यासाठी नदीत उतरले असता दोघांना वाचविण्यात यश आले.तर दोघेजण नदीत बुडाले असल्याची घटना आज,रविवार २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास वर्धा नदीच्या तुराणा घाटावर घडली.१५ वर्षीय प्रणय विनोद भोयर रा.जिजामाता वॉर्ड वरोरा व १३ वर्षीय रुपेश विजेंद्र कुळसंघे रा.कर्मवीर वॉर्ड वरोरा,जि.चंद्रपूर अशी नदीत बुडालेल्या मुलांची नावे असून दोघांचाही अद्याप शोध लागलेला नाही.उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोघांना जवळच असलेल्या एका गुराख्याने धाव घेत दोघांचे प्राण वाचविले.
आज रविवार शाळेला सुट्टी असल्याने वरोरा शहरातील चौघे मित्र दुपारच्या सुमारास शहरापासून काही अंतरावर असलेल्या वर्धा नदीच्या तुराणा घाटावर सायकलने गेले होते.सायकल आणि कपडे बाजूला ठेवत पोहण्यासाठी चौघेही नदीपात्रात उरतले.तितक्यातच नदी घाटाच्या दिशेने एक महिला येतांना दिसताच चारही मित्रांनी नदी पात्रातील पाण्यात छुपण्याचा प्रयत्न केला.अश्यातच पाण्याची पातळी वाढलेली असल्याने चौघेही खोल पाण्यात गेले.बुडत असल्याचे लक्षात येताच चौघांनीही वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड केली.प्रसंगी नदी तीरावर गुरे राखणाऱ्या गुराख्याला ओरडण्याचा आवाज ऐकू येताच तो धावून गेला आणि चौघांपैकी दोघांना वाचविण्यात यश आले.यात उमंग आणि कृष्णा यांना बाहेर काढले,तर प्रणय व रुपेश दोघेही खोल पाण्यात बुडाले.घटनेची माहिती गुराख्याने पोलिसांना देताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले.बुडालेल्या मुलांचा शोध घेणे सुरू होते.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत उद्याला शोधमोहीम राबवली जाणार आहे.
- Advertisement -

