- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट होताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.आरक्षण सोडतीनंतर तर सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यरत झाले असून काही हंगामी नेतेही मैदानात उतरतांना दिसत आहेत.यासाठी त्यांनी आपल्या प्रचारासाठी मतदारांशी भेटीगाठी सुरू करून नागरिकांसोबत चर्चा करतांना त्यांचे दर्शन होत आहे. येत्या काही दिवसांत नगरपालिका,जिल्हा परिषद, नगरपंचायती,पंचायत पंचायत निवडणुकांच्या
आचारसंहिता लागू होणार आहेत.यामुळे राजकारण अधिकच तापू लागले आहे.अश्यातच हंगामी नेतेही आपण मैदानात असल्याचे दाखवून देतांना दिसत आहेत.इच्छुकांकडून प्रचारावर अधिक जोर लावला जात असून तिकीट मिळाले नसले तरी मतदारांशी त्यांनी संपर्क वाढविण्यास सुरू केल्याचे दिसते.यंदा निवडणुकांमध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता असून फक्त निवडणुकीच्या काळात दिसणाऱ्यांची अडचण वाढण्याची चिन्हे आहेत.तर पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे सर्वच पक्ष सक्षम महिला उमेदवारांच्या शोधात आहेत.आता मागील काही महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवला आहे.पक्षांकडून अद्याप तिकीट वाटप झाले नसले तरी इच्छुकांनी जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी वाढवत मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.प्रत्येक इच्छुक उमेदवार मतदारांना पटवण्यासाठी हवी तशी आश्वासने देत आहेत; मात्र या वचनांची वास्तवता ओळखण्यात मतदार पारंगत झाले आहेत.कोण केवळ निवडणुकीपुरता सक्रिय आहे आणि कोण सतत संपर्कात राहतो,हे मतदारांना माहिती आहे.त्यामुळे “उधार से आणे दो अन् इसको जाणे दो” असे चित्र निर्माण होणार आहे.
- Advertisement -

