Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीभाजीपाला व चिकनचा दुकान जळून खाक; चिमुकल्याचे पाय भाजले..

भाजीपाला व चिकनचा दुकान जळून खाक; चिमुकल्याचे पाय भाजले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील संतोष मुत्यालू काबडे यांच्या घरासमोरील शेडला भीषण आग लागून क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करून आगीत त्यांचे भाजीपाला व चिकनचे दुकान जळून खाक झाले.नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य नेस्तनाबुत झाले होते.दुकानास आग लागली त्यावेळेस संतोष काबडे यांचा लहान मुलगा दुकानातच असल्याने आगीमुळे त्याचे पाय भाजले.त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.काल रविवारी संतोष काबडे हे दुकानात असतांनाच दुकानातून अचानकपणे धूर निघू लागला.धूर निघत असतांनाच नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. पण,आगीने भडका घेतला.लागलीच गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनास माहिती दिली.तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!