- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील आकापूर गाव परिसरातील शेतशिवारात वाघोबाने एका शेतकऱ्याचा जीव घेतल्याची घटना आज,शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.वासुदेव
लक्ष्मण वेटे वय ५५ वर्षे,रा.आकापूर,ता.नागभीड, जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते शेतावर गेले असता सदरची घटना घडली.विशेष म्हणजे,आकापूर शेतशिवारातील परिसरात काही दिवसांपूर्वीच नागरिकांना वाघाच्या जोडीचे दर्शन झाले होते.याबाबत वनविभागास माहिती देऊनही कुठल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्यानेच सदरची घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत जोपर्यंत वाघाला पकडले जात नाही आणि शेतकरी-शेतमजुरांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात नाही,तोपर्यंत मृतदेह उचलला जाणार नाही,अशी भूमिका घेतल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.घटने प्रसंगी महिला वनपरिक्षेत्र अधिकारी शहा यांनी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून विविध मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने मृतदेह उचलण्यात आला.ऐन धान कापणी आणि मळणी हंगामाच्या काळातच सदरची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

