Sunday, September 20, 2026
Homeवर्धाचालत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू.. - दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू..

चालत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू.. – दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.अश्यातच सायंकाळच्या सुमारास तिघेजण दुचाकीवरून जात असतांनाच चालत्या दुचाकीवर वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला,तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे घडली.भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे त्यांचा १७ वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या दुचाकीने भिवापूर येथून एका कार्यक्रमासाठी चारमंडळ गावाकडे जात होते.दरम्यान,धोत्रा चौरस्ता येथे येताच अचानकपणे विजांचा कडकडाट झाला आणि दुचाकीवर वीज पडली.यात वडील अनिल ठाकरे आणि मुलगा वेदांत ठाकरे हे जागीच ठार झाले.तर पुतण्या सौरभ ठाकरे हा गंभीर जखमी झाला.त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
दुसरी घटना ही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोदेपूर गावच्या शेतशिवरात घडली असून शेतात काम करत असतांनाच अंगावर वीज पडून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.यात रघुनाथ इसान उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!