Wednesday, August 5, 2026
Homeवर्धाचालत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू.. - दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू..

चालत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू.. – दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.अश्यातच सायंकाळच्या सुमारास तिघेजण दुचाकीवरून जात असतांनाच चालत्या दुचाकीवर वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला,तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे घडली.भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे त्यांचा १७ वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या दुचाकीने भिवापूर येथून एका कार्यक्रमासाठी चारमंडळ गावाकडे जात होते.दरम्यान,धोत्रा चौरस्ता येथे येताच अचानकपणे विजांचा कडकडाट झाला आणि दुचाकीवर वीज पडली.यात वडील अनिल ठाकरे आणि मुलगा वेदांत ठाकरे हे जागीच ठार झाले.तर पुतण्या सौरभ ठाकरे हा गंभीर जखमी झाला.त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
दुसरी घटना ही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोदेपूर गावच्या शेतशिवरात घडली असून शेतात काम करत असतांनाच अंगावर वीज पडून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.यात रघुनाथ इसान उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!