Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईआदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून...

आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -गडचिरोली,नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :- “आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आहे.यातून कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून या विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केंद्र सरकारच्या अंगीकृत मिनीरत्न ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्या वतीने विविध जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योगदानासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले. “नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे.स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व ‘मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील.यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धन,कृषी व वन आधारित उपजीविका या क्षेत्रात बायफ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्य चांगले आहे,”असे याप्रसंगी त्यांनी नमूद केले.
‘मॉयल लिमिटेड’ने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी “बायफ इन्स्टिटयूट फॉर सस्टेनेबल लाइव्हवूड्स अँड  डेव्हलपमेंट (बीआयएसएलडी )” स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे.ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत.या उपक्रमांमुळे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका आणि जीवनमानात सुधार होईल.तसेच ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४ हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी  विविध योजना राबवल्या जाणार आहेत,पारंपरिक बोडी-आधारित शेती प्रणाली,जलसंपदा विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून समुदाय-आधारित उपजीविकेला प्रोत्साहन दिले जात आहेत,असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांना या उपक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.याबरोबर शासनाचे विविध विभाग व  स्वयंसेवी संस्थामार्फत संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात कृषी,वन उत्पादने,ग्रामीण उत्पादने,पायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुविधा यांचा विकास साधला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!