Monday, May 25, 2026
Homeनागपूरपाय घसरला अन् आईसह चिमुकला पडला कालव्यात.. - दोघेही वाहून गेले; शोधकार्य...

पाय घसरला अन् आईसह चिमुकला पडला कालव्यात.. – दोघेही वाहून गेले; शोधकार्य सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कालव्याच्या पुलावरून पायी जात असतांनाच अचानक पाय घसरला आणि आईने हात पकडुन ठेवलेला पाच वर्षीय चीमुकलाही पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात पडल्याची घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी शिवारात काल मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळपर्यंत त्या दोघांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयाचा डावा कालवा माहुली,पटगोवारी मार्गे रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात जातो.त्यात पाणी सोडण्यात आल्याने तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दोघेही वाहून आई सह मुलगाही वाहून गेला.अल्का शेखर बिहुने वय २८ वर्षे व अरमान शेखर बिहुने वय ५ वर्षे दोघेही रा.पटगोवारी,ता.रामटेक,जि.नागपूर अशी वाहून गेलेल्या आई व मुलाचे नाव आहे.
अल्का तिच्या मुलाला घेऊन काल मंगळवारी दुपारी पटगोवारी चिचभुवन पारशिवनी मार्गावरील पुलावर गेली होती.या परिसरात काही मजूर काम करीत होते.त्यानंतर ती मुलाला घेऊन पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या कालव्याच्या रस्त्याने पायी जायला निघाली,असे प्रत्यक्ष दर्शिंनी बघितले.या पुलापासून किमान पाचशे मीटर अंतरावर तिचा पाय घसरला आणि दोघेही कालव्यात पडले.कालव्यातील पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने दोघेही रामटेक तालुक्याच्या दिशेने वाहत गेले.माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठाणेदार राजेशकुमार थोरात,हवालदार पृथ्वीराज चव्हाण,मुद्दसर जमाल, देवा उकेबोंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही शोध सुरू केला.सायंकाळपर्यंत ते कुठेही आढळून आले नाहीत. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून आज,बुधवार १३ ऑगस्ट रोजी पुन्हा शोधकार्य राबविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!