Wednesday, May 20, 2026
Homeनागपूरअनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

अनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर आणि काटोल मार्गावरील मोवाड गावाकडे विटा भरून जाणाऱ्या एका आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक पलटी होऊन तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला,तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,मंगळवार १९ मे रोजी सावनेर तालुक्याच्या ईसापूर(झिल्पा) गावाजवळ घडली.लीलाधर विष्णूजी वालूलकर वय ४० वर्षे,अजित निलकंठ भलावी वय ४० वर्षे व संजय सुदामजी कनेरे वय ४४ वर्षे अशी मृतकांची नावे असून हेमराज लक्ष्मण कन्हेरे आणि सुभाष जयराम धुर्वे आणि राजेंद्र राजगुरू अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्वजण नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्याच्या मोवाड गावचे रहिवासी आहेत.
आज मंगळवारी दुपारच्या सुमारास एमएच २३ एयू ३२३५ क्रमांकाच्या आयशर ट्रकमध्ये विटाभरून सहा मजूर व ट्रक चालक मोवाड गावाकडे जाण्यासाठी निघाले होते.उन्हाची तीव्रता लक्षात घेता मजूर केबिनमध्ये झोपलेले होते.दरम्यान,ईसापूर(झिल्पा) गावाजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.यात ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला,तर तिघेजण गंभीर जखमी झाले.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.यावेळी ट्रक चालक तथा मालक प्रवीण उर्फ गोलू बले रा.मोवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. काटोल पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१,१२५(अ),१०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार रणजीत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोरचीत ‘सगुणा भात शेती तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिक.. -पाण्याची बचत,मजुरीत कपात आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तालुका कृषी विभाग कोरची यांच्या वतीने मौजे शिकारीटोला येथे ‘सगुणा भात लागवड तंत्रज्ञान’ (SRT)या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतीचे प्रत्यक्ष शेतावर...

बापरे..! फेरफार नोंदीसाठी तलाठ्याने मागितले १ लाख २५ हजार.. – तलाठी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये नाव नोंदवण्यासाठी चक्क १ लाख २५ हजाराची लाच मागून १ लाख रुपये स्विकारले व उर्वरित...

अखेर किडनी विक्री प्रकरणातील शेतकऱ्यास ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरीत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन शिवदास कुळे वय ३५ वर्षे या शेतकऱ्याची व्यथा ऐकून दगडलाही पाझर फुटेल अशी घटना मंगळवार १६ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस...

तेंदूपाने तोडत असतांनाच वाघाचा हल्ला; महिला ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.सकाळच्या सुमारास जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेवर दबा धरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!