- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राशन कार्डधारक लाभार्थ्यांना
ई-केवायसी संदर्भात पुरवठा विभागाकडून वारंवार आवाहन केले जात आहे.परंतु,ई-केवायसी करण्याकडे
बरेच लाभार्थी दुर्लक्ष करतांना दिसून येत आहेत. अनेक भागात धान्य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने कडक धोरण अवलंबले आहे.अन्न सुरक्षा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा,या दृष्टीने बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे.त्यासाठी आता रेशनकार्डवरील सर्वच सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्न करणे अनिवार्य केले आहे.ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आधारआधारित ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रदान करणे आवश्यक आहे.शिधापत्रिकेची (राशनकार्ड)ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आता ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी या मुदतीत ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ बंद होऊ शकतो किंवा रेशनकार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते.
- ई-केवायसी प्रक्रिया👇
गुगल प्ले स्टोअरमधून ‘Aadhaar Face RD Service’ ॲप मोबाइलवर इन्स्टॉल करा.त्यानंतर ‘Mera E-KYC’ हे ॲप इन्स्टाल करा.ॲप उघडल्यानंतर राज्य निवडा व ठिकाण टाका.आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP मोबाइलवर आल्यावर तो रकान्यात टाका.माहिती भरल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.यावेळी मोबाइल स्क्रीनवर दिसणारी माहिती व्हेरिफाईड करा आणि सबमिट करा.त्यानंतर ‘फेस eKYC’ वर क्लिक करा.सेल्फी कॅमेरा उघडल्यावर डोळे बंद करा व उघडा.फोटो काढून होताच eKYC पूर्ण होईल व तसा मेसेज दिसेल.
- Advertisement -

