वर्धा :-जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या निमसडा गावात शेतीच्या हिस्सेवाटणीचा वाद टोकाला जाऊन झालेल्या वादात सख्ख्या पुतण्याने काकू व चुलत भावाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवार २८ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निमसडा गावातील शेत शिवारात घडली.साधना सुभाष मोहिजे वय ४७ वर्षे रा.निमसडा,नितीन सुभाष मोहिजे वय २७ वर्षे रा.निमसडा अशी मृतांची नावे असून आरोपी पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिजे वय ४८ रा.निमसडा असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वर्धेचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन सह अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल चौहन तातडीने निमसडा गावात दाखल झाले.घटनेतील संपूर्ण स्थितीचा आढावा घेत तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले.प्रकरणी पोलिस मृतांचे शेजारी व नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेत आहेत.हल्ली शेतीचा हंगाम सुरू असल्याने मृत साधना आणि तिचा मुलगा नितीन आज सकाळच्या सुमारास शेतावर गेले होते.आरोपी महेंद्र हा सुद्धा शेतावरच होता.पूर्वीपासूनच तिघांमध्ये शेतीचा वाद सुरू होता. अश्यातच परत पुन्हा आज शनिवारी सकाळच्या सुमारास तिघांमध्ये शेतीची हिस्सेवाटणी व इतर कारणांवरून वाद झाला.वाद सुरू असतांनाच आरोपी महेंद्र याने रागाच्या भरात हातातील कुऱ्हाडीने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाल्याने आरोपी महेंद्र याने घटनास्थळावरून पळ काढत विष प्राशन केले.त्याला तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.मात्र,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेला असून केवळ शेतीचा वाद तिघांच्या मृत्यूचे कारण ठरल्याने संपूर्ण परिसरात सदरचा हत्याकांड एकच चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
शेतीच्या हिस्सेवाटणीचा वाद टोकाला गेला; माय-लेकाची हत्या करून स्वतःही केले विष प्राशन.. – सकाळच्या घटनेने परिसर हादरला..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

