- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सहन करायचे झाले म्हणून किती सहन करावे,सहनशीलतेचा बांध जेव्हा फुटतो,तेव्हा साधा माणूसही विक्राळ अवतारात दिसू लागतो.अश्याच प्रकारे आज येईल,उद्या येईल म्हणता-म्हणता दोन आठवडे निघून गेलीत.पण नळाला पिण्याचे पाणीच येईना.! त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी चक्क ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकल्याची घटना काल, गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे घडली.व्याहाड खुर्द येथे जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेतंर्गत चंद्रपूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत ४ कोटी ९० लाख ५७ हजार रुपयांची नळयोजना सुरू करण्यात आली. योजनेत व्याहाड खुर्दसह दोन गावांचा समावेश आहे. सुरुवातीला पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून योजनेत तांत्रिक बिघाडीने पाणीपुरवठा ठप्प झाला.अश्यातच दोन आठवड्याचा कालावधी लोटूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.त्यातच हल्ली पावसाचे दिवस असून गावातील विहीर व बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही.अशातही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने व घटनेच्या दिवशी ग्रामपंचायतीत जाऊन कुणीही उपस्थित नसल्याने नाईलाजास्तव दिमाक खराब होऊन उपस्थित महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूपबंद केले.
- Advertisement -

