- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.जंगलाचा राजा म्हणविल्या जाणाऱ्या वाघांच्या मृत्यूने वन विभाग अलर्ट मोडवर असला तरीही मृत्यू रोखण्यात अपयशी ठरू लागल्याचे चित्र आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवनपरिक्षेत्र कार्यालय अंर्तगत रत्नापूर बीटातील सरांडी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-४५/६०९ मधील रामकृष्ण कावळे यांचे शेताजवळ जंगलात एक वाघ काल मंगळवारी मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.सदरचा वाघ हा नर असून १६ वर्षे वयाचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती वन विभागास मिळताच घटनास्थळी पंचनामासाठी सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी अंजली बोरीवार, नवरगावचे क्षेत्र सहाय्यक एस.एन.उसेंडी, सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले,रत्नापूरचे वनरक्षक ओमप्रकाश चहांदे,नवरगावचे वनरक्षक माधुरी सुरपाम,वनरक्षक नितेश शहारे,स्वाँब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर,वन रक्षक, वनमजूर वन कर्मचारी मोठ्या संस्थेने उपस्थित झाले.पंचनामा दरम्यान,मृत वाघाचे सर्व अवयव कायम असल्याचे दिसून आले व वाघाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.त्यानुसार मृत वाघास शवविच्छेदनसाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.शवविच्छेदनानंतरच वाघाचे मृत्यू कशामुळे झाले,हे कळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

