- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला चांगला तांदूळ काही राईसमिल मालक खुल्या बाजारात विक्री करून त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासनाला पुरवठा करतात.हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित केला जात असल्याचा प्रकार लक्षात येताच पोलीस यंत्रणा अश्यांच्या मागावर होती.त्यानुसार चंद्रपूरमध्ये स्वस्त धान्य दुकानांतील तांदळाची तस्करी करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे.पोलिसांनी गोदामावर छापा टाकत कारवाई केली असून तांदूळ जप्त करीत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.चंद्रपुरात बिनबागेट परिसरातील ताज एंटरप्रायझेसच्या गोदामावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी छापा टाकत कारवाई केली आहे.या कारवाईत १३ टन तांदूळ जप्त केला असून ज्याची किंमत सुमारे ३ लाख ९० हजार रुपये आहे.हा तांदूळ देसाईगंज (वडसा)येथे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.अर्थात रेशनच्या तांदळाचा सुरु असलेला काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये शासकीय योजनेअंतर्गत अल्पदरात तांदूळ मिळतो.चांगला तांदूळ बाजारात विक्री करायचा आणि निकृष्ट दर्जाचा तांदूळ गोर-गरिबांच्या माथी मारायचा,असा गोरखधंदा अनेकांनी सुरू केला असल्याने एक दिवस गोर गरिबांची अश्यांना हाय लागणार आहे.
- Advertisement -

