उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात दमछाक होत असतांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यात भरपूर कालावधी निघून जात असतो. त्यातच एखाद्याने घोडचूक केली तर त्यास शिक्षा होणे अपेक्षित असते.असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात उघडकीस आला.एका व्यक्तीला देण्यात आलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रावर ‘अर्जदाराला मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर वारंवार तक्रार करण्याची सवय आहे’ असे लिहिल्याबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केले आहे आणि तक्रारदार रूपेश देशमुख यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.या घटनेबद्दल,चारित्र्य प्रमाणपत्र देण्याचे काम पाहणारे हेड कॉन्स्टेबल बलराम आणि मुख्यमंत्री हेल्पलाईनचे प्रभारी कॉन्स्टेबल विप्लव यांना निलंबित करण्यात आले आहे.अथनेर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी देशमुख यांनी म्हटले की,त्यांनी स्वतःसाठी चारित्र्य प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता.चारित्र्य प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण मंच,मुख्यमंत्री हेल्पलाइनकडे तक्रार केली.या तक्रारीने पोलिस कर्मचारी चिडला आणि प्रमाणपत्र देतांना त्याने त्यावर लाल शाईने लिहिले की, अर्जदाराला मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर वारंवार तक्रार करण्याची सवय आहे.सदरच्या प्रकारामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
चारित्र्य प्रमाणपत्रावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी दोन पोलीस निलंबित..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

