Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरपोलीसांनी जप्त केले २ लाख; दाखविले ४० हजार- जुगार कायद्यान्वये केली होती...

पोलीसांनी जप्त केले २ लाख; दाखविले ४० हजार- जुगार कायद्यान्वये केली होती कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथील पवन भगत यांच्या घरातून ९५ हजार रुपये,तर मोहन तोकलवार यांच्या घरातून १ लाख १० हजार रुपये जप्त केले.पवन व मोहन यांच्यावर जुगार कायद्यान्वये बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु,जप्तीमध्ये केवळ ४० हजार रुपये दाखविण्यात आले; असा आरोप पवन भगत यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच चर्चेत आली होती.चर्चा नमण्यापूर्विच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवाईत जप्त केलेल्या एकूण दोन लाख पाच हजार रोकडपैकी केवळ ४० हजार रुपयेच दाखवले व उर्वरित रक्कम आपसात वाटप केल्याची गंभीर तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रकरणातील आरोपी बल्लारपूर येथील पवन भगत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.त्यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या कारवाईतील रकमेची अफरातफर करून आपापसात वाटप केल्याचा गंभीर आरोप करून शासन दरबारी चुकीची नोंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.आता चेंडू पोलिस अधीक्षकांच्या कोर्टात गेल्याने ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईत अधिक रोकड जप्त करून शासन दरबारी कमी रक्कम दाखवल्याची माहिती होताच जिल्ह्यातील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.उलगुलान संघटना,भीम आर्मी, दलित पँथर आदी संघटनांनी एकत्र येत जप्तीच्या कारवाईत हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!