- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाघाची वा इतर प्राण्यांची शिकार करणे वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा आहे.वाघाची कातडी तसेच इतर अवयवांची परदेशात मोठी मागणी असल्याने शिकार करणारे टोळ्या तयार करून वाघाची शिकार करीत असतात.अशातच वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला आज,सोमवार २७ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.बेहेलिया टोळीवर २०१३ ते २०१५ या कालावधीत विदर्भातील जवळपास १९ वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे.बहेलिया टोळी ही मध्य प्रदेशातील आहे.अजित राजगोंड हा टोळीचा म्होरक्या आहे.बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ मध्ये विदर्भातील जवळपास १९ वाघांची शिकार केल्याचा संशय वनविभाग व पोलिसांनी व्यक्त केला आहे.या शिकारीमागे अजित व त्याचे दोन भाऊ केरू व कुट्टू यांचा हात असल्याने अजित राजगोंड याची अटक एक मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.विशेष म्हणजे,वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने २०१५ मध्ये तिरुपती येथून अजित राजगोंड याला अटक केली होती.त्यानंतर सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास करून अजितला शिक्षाही ठोठावली होती.त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.पण आता त्याच्यासारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्यामुळे वनविभागाची चिंता वाढली आहे.
- Advertisement -

