Thursday, July 30, 2026
Homeचंद्रपूरवाघोबाची झलक पहायची असेल तर किमान दोन महिने पाहावी लागणार वाट..

वाघोबाची झलक पहायची असेल तर किमान दोन महिने पाहावी लागणार वाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघोबाची एक झलक पाहण्यासाठी देशभरातील वन्यप्रेमींसह विदेशी पर्यटकही आतूर असतात.मात्र,तुम्ही जर ताडोबातील वाघाचे दर्शन घेण्याचा बेत आखत असाल तर तुम्हाला किमान दोन महिने वाट पाहावी लागेल.कारण,फेब्रुवारीपर्यंतचे जंगल सफारीचे बुकिंग फुल्ल झाले आहे.मार्चमध्येच तुमचे ‘वेटिंग’ संपणार असून,त्यानंतर व्याघ्रदर्शनाचा मुहूर्त असणार आहे.
ताडोबाची जंगल सफारी केली की हमखास वाघ पाहायला मिळतोच.यामुळेच वन्यजीव प्रेमींसह पर्यटकांचा ओढा ताडोब्याकडे वाढला आहे.ताडोबा परिसरात राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे रिसॉर्ट या सोयींमुळे पर्यटकांची सर्वकाळ ताडोब्याला पसंती असते.सध्याच्या स्थितीत तर ताडोबासाठी जंगल सफारीचे बुकिंग मिळणे कठीण झाले आहे.येथील मोहर्ली,नवेगाव,कोलारा व पांगडी-झरी हे सर्व गेट (कोअर झोन) फेब्रुवारीपर्यंत हाऊसफुल्ल आहेत.मोहर्ली गेटवर मार्चनंतरही फक्त १० ते १५ टक्केच बुकिंग आहेत.नवेगाव गेटवर तर त्यापेक्षाही कमी फेऱ्या शिल्लक आहेत.त्यामुळे वेट अँड वाचची भूमिका असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!