- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-चार वर्षीय चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बालटीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवारी २० डिसेंबरला सकाळच्या सुमारास तुमसर तालुक्याच्या डोंगरी बुज.येथे घडली.रिधाणा प्रमोद शेंद्रे वय ४ वर्षे रा.डोंगरी बुज.ता.तुमसर असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा जोर सर्वत्र कायम आहे.त्यामुळे थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागांमध्ये सकाळच्या सुमारास पाणी गरम करून आंघोळ वा इतर क्रिया केल्या जातात.त्यानुसार आज सकाळच्या सुमारास डोंगरी बुज.येथील शेंद्रे कुटुंबीयांनी स्वयंपाक खोलीमध्ये पाणी गरम करून एका बालटीत ठेवले होते.अशातच रिधाणा हा आपल्या घरीच खेळत होता. खेळता-खेळता तो स्वयंपाक खोलीमध्ये ठेवलेल्या उकळत्या पाण्याच्या बालटीत पडला.त्यात त्याचे शरीर गळ्यापासून पायापर्यंत गंभीररित्या भाजले गेले.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी रिधाणा यास सर्वप्रथम तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.नंतर तुमसर रुग्णालयातून भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रिधाणाचे शरीर गंभीररीत्या भाजल्याने त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रसंगी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला.याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
- Advertisement -

