Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूर२८ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या..!

२८ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका २८ वर्षीय तरुणाची अज्ञात चार तरुणांनी चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची  खळबळजनक घटना काल,शुक्रवारी २७ डिसेंबरच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास मुल येथे घडली.त्यामुळे शहरात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.रीतिक अनिल शेंडे वय २८ वर्षे रा.मुल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल शुक्रवारी रात्री रोहीत शेंडे हा पंचायत समिती नजिक असलेल्या नगर पालिकेच्या बस थांबा शेड मध्ये बसला होता.अशातच अचानकपणे येत चार युवकांनी त्याच्यासोबत वाद घातला.वाद सुरू असतांनाच चाकूने पोटावर आणि पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहीतला काही नागरिकांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच  रात्री नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात  मोठा जमाव गोळा झाला होता.घटनेच्या निषेधार्थ आज,शनिवारी मूल मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.घटनेनंतर मूलमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!