- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-मोबाइलवरून ऑनलाइन चॅटींग करतांना अनोळखी युवकाचे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील एका विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले असल्याची घटना काल, बुधवारी २ एप्रिलला उघडकीस आली.विविध आमिष देऊन ब्लॅकमेल करणे,आत्महत्या करण्याची व छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरची विद्यार्थिनी घरच्यांना न सांगताच त्याला भेटायला थेट आसाम येथे गेली होती.पोलिसांच्या सतर्कतेने तिला परत आणून कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले.
मूल शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षाला शिकणारी १८ वर्षांची युवती १९ मार्च २०२५ रोजी महाविद्यालयात जाते,असे घरी सांगून बाहेर निघाली.मात्र,रात्र होऊनही ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलगी हरविल्याची तक्रार मूल ठाण्यात केली.परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार प्रमोद चौगुले यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच शोध पथक तयार केले. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी, पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम,भोजराज मुंडरे, संदीप चौधरी आदींचा समावेश होता.या पथकाने मयुरीच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन सायबर सेलकडून मिळविले,तेव्हा तिचे लोकेशन आसाम राज्यातील कचर जिल्ह्यात आढळून आले.
दरम्यान,ठाणेदार चौगुले यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिली.त्यांच्या परवानगीनंतर पोलिसांनी आसाम राज्यातील कचर पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला.दुसऱ्या दिवशी मूलचे शोध पथक आसाम राज्यात रवाना झाले.
मूल पोलिसांनी आसाम पोलिसांना मयुरीचे मोबाइल लोकेशन व छायाचित्रे पाठवून ताब्यात घेण्याबाबत कळविले.दोन दिवसांनी हे पथक आसामच्या कच्चर जिल्ह्यात पोहोचल्यानंतर पोलिस अधीक्षक माहत्ता व अप्पर पोलिस अधीक्षक रंजित पॉल यांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात उदरबौंड पोलिस ठाण्याचे प्रभारी सी-इंम-सिम्स-तिमुंग यांच्या मदतीने मयुरीला ताब्यात घेतले.सदरची युवती मूल येथे परत आल्यानंतर प्रभारी ठाणेदार प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात कुटुंबाकडे स्वाधीन केले.आरोपी युवकाने आत्महत्येची धमकी दिल्याने घाबरून आसामला गेल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली.युवक व युवती तसेच विद्यार्थ्यांनी इंन्स्टाग्राम,फेसबुक,स्नॅपचॅट आयडीवरून आलेल्या अनोळखी फेंन्डशिपचा स्वीकार करू नये,शंका आल्यास तत्काळ आपल्या कुटुंबीयांशी व पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.पालकांनी आपली मुले सोशल मीडियावर काय करतात,याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.
- Advertisement -

