- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-लागवड केलेल्या भातपीकाचा कालावधी लोटूनही पीक हाती आले नसल्याने शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांना ग्राहक तक्रार मंचाकडे धाव घ्यावी लागले असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरस येथे कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.मांगली चौरस येथील काही शेतकऱ्यांनी आसगाव येथील एका कृषी केंद्रातून रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी करून भातपीकाची लागवड केली.पीक लागवडीसाठी केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचे भात पिकाचे वाण खरेदी केले होते.या पिकाचे उत्पादन १०० दिवसात येण्याचे कंपनीकडून तसेच सदरचे भात पिकाची लागवड केल्यानंतर १०० दिवसात त्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितल्या गेली होते. मात्र,१२५ दिवस लोटूनही भातपीक हातीच आलेले नाही.उलट शेतकऱ्यांना या भात पिकासाठी आणखी २० ते २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.अर्थात पीक उत्पादन हाती येण्यास विलंब होत असल्याने खरीप हंगामासाठी शेती तयार करण्यास देखील विलंब होत आहे.सदरच्या प्रकाराबाबतची तक्रार कृषी विद्यापीठ आणि कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.यानंतर एका कृषी तज्ञांच्या टीमने पिकाची पाहणी केली.यात त्यांनी दिलेल्या अहवालानंतर आता शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे लक्षात आले.त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाई मिळावी; यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत दाद मागण्यात आली आहे.
- Advertisement -

