Wednesday, August 5, 2026
Homeदेसाईगंजहजारोच्या संख्येने बौद्ध बांधव धडकले देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर... - बुद्धगया येथील महाबोधी...

हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव धडकले देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर… – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही.ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,यासाठी आज,मंगळवार १८ मार्च रोजी देसाईगंज येथे अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने भव्य जन आक्रोश शांती मार्च काढण्यात आला.या आंदोलनांतर्गत देसाईगंज तालुक्यातील हजारो बौद्ध बांधव उपविभागीय कार्यालयावर धडकले.भव्य जन आक्रोश शांती मार्च सर्वप्रथम शहरातील दीक्षाभूमी या ठिकाणाहून मुख्य मार्ग,फवारा चौक ते उपविभागीय कार्यालय या ठिकाणी धडक देत उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले व बौद्ध बांधवांसह अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने
उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला आहे.इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले.शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली,तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई १९९२ पासून आंदोलन करीत आहेत.सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वत्र संघटना आक्रमक झाल्या आहेत.
प्रमुख मागण्या👇
बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा,बुद्धगया मंदिर व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करावी,महाबोधि विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूंऐवजी बौद्ध समाजाच्या हाती सोपवावे,यासाठी आंदोलन केली जात आहेत.यासंदर्भात देसाईगंज उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार विलास तुपट यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना बौद्ध बांधव तथा अखिल भारतीय भिख्खू संघाचे भंते यांच्या वतीने मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
भव्य जन आक्रोश आंदोलनाचे व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!