- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी नव्या इमारत बांधकामासह रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उचलून धरत शासनाने यावर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी विधानभवनात आवाज उठवला.मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा काल,शुक्रवार १८ जुलै रोजी शेवटचा दिवस होता.प्रसंगी आमदार मसराम यांनी शासनाचे लक्ष वेधले.
आरमोरी मतदारसंघात देसाईगंज व आरमोरी या दोन नगरपरिषदा असून या दोन्ही ठिकाणी अद्याप जुन्या व जीर्ण इमारतींमधून कामकाज सुरू आहे.नागरिक व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या दोन्ही नगरपरिषदेसाठी तात्काळ नवीन इमारती मंजूर करण्यात याव्यात.शासनाकडून यापूर्वी नवीन प्रशासकीय इमारतींची मंजुरी मिळाली होती.मात्र,काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या अडथळ्यामुळे ही मंजुरी शासनाकडे परत गेली आणि काम रखडले.अश्यातच कुरखेडा व कोरची या दोन नगर पंचायती आहेत.दोन नगर परिषद व दोन नगरपंचायतीतील रिक्त पदांमुळे आवश्यक असलेली प्रशासनिक यंत्रणा अपुरी पडत आहे.त्यामुळे नागरिकांसह येथील विकासकामांबाबत तसेच दैनंदिन शासकीय सेवांबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज सुरळीत व्हावे,यासाठी नव्या इमारत बांधकाम तसेच यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत,जेणेकरून
नागरिकांना दिलासा मिळून प्रशासकीय यंत्रणा
गतिमान होण्यास मदत होईल,असेही आमदार मसराम यांनी विधानभवनात आवाज उठवत स्पष्ट केले.
- Advertisement -

