Tuesday, July 21, 2026
Homeभंडारासावधान..! घरकुलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय.. - महिलेस घातला गंडा..

सावधान..! घरकुलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय.. – महिलेस घातला गंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राज्यात सध्या स्थितीत विविध घरकुल योजने अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.त्यामुळे काही भामट्यांकडून वयोवृध्द तसेच निरक्षर लोकांचा फायदा घेत तुमच्या नावाने घरकुल आले आहे, त्यासाठी काही रक्कम द्यावी लागणार सांगून पैसे लुटण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.  जिल्हा परिषद मधील अधिकारी असल्याचे सांगून भामट्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने आपबिती सांगितल्याने सदर प्रकरण उजेडात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात घरकुल यादी प्रसिद्ध होऊन बऱ्याच ठिकाणी कामाला प्रारंभ झाला आहे.याचाच फायदा घेत पवनी तालुक्याच्या कातुर्ली येथे एका भामट्याने गावात प्रवेश केला.जिल्हा परिषदमधील अधिकारी आहे,असे सांगून गावातीलच एका महिलेला घरकुल आल्याचे बोलला.त्यासाठी सहा हजार रुपये रोख रक्कम द्यावी लागेल,अन्यथा तुमचे घरकुल परत जाईल असे सांगितले.महिलेने आमिषाला बळी पडत घरात असलेले सहा हजार रुपये त्या भामट्याला दिले. घडलेला हा प्रकार काल रविवारला महिलेच्या लक्षात आला.गावात कुठल्याही प्रकारची मुनादी व सूचना नसतांना घरकुलाचा मुद्यावर कुणी कसे पैसे मागू शकतो यावरही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोण,कुठल्या प्रकारे फसवणूक करेल,हे सांगताच येत नाही.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगलेली बरी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!