- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-संभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता,एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.त्यामध्ये जून,जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत धान्याचा समावेश राहणार आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य अतिवृष्टी, पूरपरिस्थिती लक्षात घेता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यादृष्टीने पुरवठा विभागाकडून तयारी सुरू आहे.येत्या १५ जूनपर्यंत राज्यात मॉन्सून
सक्रिय होईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सुरुवातीच्या काळात जोरदार पाऊस पडतो, त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी,नदी-नाल्यांना पूर येऊन आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू शकते.अशावेळी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तीन महिन्यांचे रेशन ३० जूनपूर्वी वितरित करण्यात येणार आहे.राज्यातील पुरवठा विभाग कामाला लागला आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व रेशन दुकानांत धान्य पोहोचविण्यात येत आहेत.१५ जूनपर्यंत पूर्ण धान्य पोहोचेल,यासाठी नियोजन सुरू आहे.तसेच वेळेत सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळेल असा विश्वास पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.यंदा पहिल्यांदाच तीन महिन्यांचे राशन एकाचवेळी मिळणार असल्याने पोटा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे.
- Advertisement -

