Wednesday, September 2, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय..आम्ही करतो तक्रार; खिसे त्यांचे गरम होतात...!

संपादकीय..आम्ही करतो तक्रार; खिसे त्यांचे गरम होतात…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/ सत्यवान रामटेके 

उद्रेक न्युज वृत्त :- एखादेवेळी काही प्रकरणे सार्वजनिक हिताची म्हणून उघड करावी लागतातच; मात्र काही प्रकरणातील सार्वजनिक हित जोपासून भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडण्याचा कितीही प्रयत्न जरी केला; तरी केलेले प्रयत्न असफल ठरतात.याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही तक्रार करायची आणि ज्यांच्याकडे तक्रार केली जाते; त्यांचे खिसे गरम होतांना दिसून येतात.नकळत खिसे गरम झालेले एवढ्यावरच थांबत नाही तर पलटी होऊन घडलेल्या प्रकरणाची जणूकाही अशांना कल्पनाच नसते; असे भासवित असल्याने शेवटी तक्रार कर्ते हताश होऊन ‘जाऊ द्या नं..! आमच्या बापाचा काय जातोय? असे म्हणून गप्प बसतात.

मुख्यत्वे गप्प बसणाऱ्या व्यक्तींवर समाज माध्यमातून अनेक ठिकाणांहून टीका-टीप्पणी केली जाते.काही ठिकाणी चक्क तक्रार कर्त्यावरच आरोप लावले जातात.तक्रार कर्ता गप्प बसला म्हणजे ‘त्याची सेटिंग झाली असावी’, ‘ हे पैशासाठीच करतात ‘ अशी अनेक टीका-टिप्पणी करून सर्वजण मोकळे होतात.मात्र खरी परिस्थिती वेगळीच असते.ज्यांचे खिसे गरम केले जातात त्यांनाही वाटते की,सगळे काही आमच्याच हातात आहे; असे म्हणून भ्रष्टाचाऱ्यांची बाजू घेऊन थातुर-मातुर चौकशी करून प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करीत असतात.

खरे म्हणजे समोरील व्यक्तीने आपली बाजू उत्कृष्ट व सबळ रहावी; याकरिता कितीही खिसे गरम केले वा आपला कितीही बोलबाला करून अनेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला; तरीही असा व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून कधीही सुटूच शकत नाही.आज ना उद्या भांडाफोड होणारच.आजच्या स्थितीत ‘ पैसा करे,कैसा’ असे जरी असले तरीही सर्वच ठिकाणी पैसाच काम करतो असेही नाही व सर्वच भ्रष्ट असतात असे म्हणता येणारही नाही; काहीजण याला अपवाद सुध्दा आहेत.ज्यांचे खिसे गरम केले गेले आहेत; अशांनी भ्रमात जाऊ नये; एक ना एक दिवस ‘अती तिथे माती’ झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!