Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईराष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना हायकोर्टाचा दणका 

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना हायकोर्टाचा दणका 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डिसेंबर २०२१ मध्ये दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होत्या.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असतानाही ममता बॅनर्जी बसून राहिल्या.काही सेकंदांनी त्या अचानक उठल्या आणि दोन ओळी गाऊन गप्प झाल्या यानंतर तिथून निघून गेल्या.

ममता बॅनर्जींच्या या वर्तनाने संतप्त झालेले भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी मार्च २०२२ मध्ये कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले होते.ममता बॅनर्जी यांनी जानेवारी २०२३ मध्ये विशेष MP-MLA कोर्टात त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले.त्यावर न्यायालयाने दंडाधिकार्‍यांना तक्रारीवर नव्याने विचार करण्यास सांगितले होते, तर ममता यांची तक्रार रद्द करण्याची मागणी होती.

MP-MLA न्यायालयातून त्यांच्या बाजूने निर्णय न मिळाल्याने ममता यांनी उच्च न्यायालयात अपील केले, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याऐवजी तक्रार रद्द करण्याची मागणी केली. परंतु, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही तक्रार रद्द करण्यास नकार दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!