- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याचा शासन निर्णय २५ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला.शासन निर्णय निर्गमित करून महिनाभराचा कालावधी लोटूनही बोनस देण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नसल्याने ऐन हंगामाच्या वेळेस आर्थिक मदत मिळत नसेल तर अश्या बोनस मिळण्याचा फायदा काय? शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ बोनस जमा करावा,अशी मागणी ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या कमी भावामुळे दिवसेंदिवस धानाची शेती तोट्यात चालली आहे.शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रति हेक्टर २० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते.सुरुवातीला आश्वासन दिले व नंतर शासन निर्णय निर्गमित केले.बोनासची रक्कम आज मिळेल,उद्या मिळेल,म्हणता-म्हणता महिना लोटून गेला तरीही बोनस जमा होण्याचे नावच घेत नाही.
जिल्हाभरातील शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करीत आहेत.त्यासाठी याकरिता ते बँकेत जाऊन चौकशी सुद्धा करीत आहेत.दुसऱ्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होत आहे.खरीप पिकाची लागवड करण्याचा आता केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे.या पिकांचे नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.येत्या पंधरा दिवसानंतर बियाणे खरेदीची लगबग वाढणार आहे. ज्या भागात अवकाळी पाऊस झाला त्या भागात शेती नांगरणीला सुरुवात झाली असून हा खर्च भागविण्यासाठी शेतकरी प्रोत्साहन रकमेची प्रतीक्षा करीत आहेत.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन त्वरित तात्काळ त्यांच्या खात्यात बोनस जमा करावे,अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी पत्रकातून केली आहे.
- Advertisement -

