चंद्रपूर :-शेतीचे पावसाळी हंगाम सुरू झाल्याने शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे.शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी शेतशिवारात जात आहेत. अश्यातच शेतात कामे करीत असतांनाच सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत.तर काही ठिकाणी शेतातील विजेचे खांब विद्युत तारेसह खाली पडत आहेत.अश्याच प्रकारे काल मंगळवारी कोरपना तालुक्याच्या सावलहिरा गाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब पडले.त्यात शेतकरी प्रफुल जोगी यांच्याही शेतातील विद्युत खांब तारेसह पडलेले होते.त्यातच प्रफुल जोगी यांचा १८ वर्षीय मुलगा आनंद जोगी आज,बुधवार २५ जून रोजी शेतावर काही कामे करण्यासाठी गेला असता,काल मंगळवारी वादळामुळे पडलेल्या विद्युत खांबांच्या तारेचा विद्युत पुरवठा खंडित असल्याचे गृहीत धरून त्याने काम सुरू केले.यादरम्यान,तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलीस प्रशासनास देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
शेतावर कामासाठी गेला; पण परतलाच नाही..! – १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

