- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-नुकताच संसद व राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचा दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल मंगळवारी मुंबईत समारोप झाला.संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते.पण,याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.लक्षवेधनारी बाब म्हणजे, काटकसरीवर चर्चा करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे,वाट्या व ग्लास हे चक्क चांदीचे होते. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था निखील केटरर्सकडे होती.यासाठी चांदीची भांडी भाड्याने आणली होती.एका ताटाचे दिवसाचे भाडे ५५० रुपये होते.तर एका थाळीचा दर ४ हजार रुपये होता. विधिमंडळातील अधिकाऱ्यांनीच याची पुष्टी केली आहे.भोजनात कोथिंबीर वडी,मालवणी करी,सुरमई फ्राय,दहीवडे, बटाट्याची भाजी व पुरण पोळी असा माठी मेन्यू होता.एकीकडे राज्य कर्जाच्या खाईत असतांना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते.राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना चांदीच्या ताटात जेवण देण्याची काही गरज होती कां? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘बरं झालं चांदीच्या ताटात सोने जेवायला दिले नाहीत तर’..अशी टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही,धानाचा बोनस नाही, गरीब,शेतकरी,सामान्य जनतेला त्यांचे हक्काचे पैसे सरकार देत नाही आणि अंदाज समितीच्या बैठकीला येणाऱ्यांसाठी मात्र चांदीच्या ताटात जेवण दिले जाते. सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असतांना राज्यकर्ते उधळपट्टीत लागले,असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
- Advertisement -

