उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यात विद्युत प्रशासनाने दिलेल्या १२ तास विद्युत पुरवठ्याच्या हमीमुळेच कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिके उभी केली.मात्र ऐन रोवणीच्या काळातच विद्युत विभागाने लोडशेडींगचे कारण समोर करुन १२ तास विद्युत पुरवठ्या ऐवजी ८ तास पुरवठा असा नियम लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा व आमरण उपोषनाचा मार्ग अवलंबावा लागला.आंदोलनाची तिव्रता लक्षात घेवुन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दोन मागण्या पुर्ण केल्या. हे केवळ शेतकऱ्यांच्या संघटनात्मक आंदोलनाचे व आमरण उपोषनाचे फलित असुन राजकिय सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटु नये; अशी माहिती रामदास मसराम यांनी आज,६ मार्च रोजी देसाईगंज विश्राम गृहातिल आयोजित पत्रकारपरिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना शेतकरी नेते रामदास मसराम म्हणाले की,देसाईगंज तालुक्यातिल ग्रामिण भागातिल शेतकरी प्रामुख्याने रब्बी हंगामाकरिता कृषी पंपधारक शेतकरी धान पिक व मका पिकाची लागवड करतात.विद्युत विभागाने १२ तास सुरळित विद्युत पुरवठ्याच्या आश्वासनामुळेच शेतकऱ्यांनी शेतात पिकाची लागवड केली.मात्र ऐन रोवणी ची लागवड सुरु असतांना विद्युत प्रशासनाने लोड शेडींग चे कारण सामोर करुन १२ तास विद्युत पुरवठ्या ऐवजी ८ तास विद्युत पुरवठ्याचा नियम लावला.या जाचक अटीमुळे पिक धोक्यात आले.पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी विद्युत प्रशासनाच्या विरोधात१३ फेब्रुवारी ला घेराव आंदोलन आंदोलन उभे केले.या रास्त मागणीसाठी पोलिस प्रशासनाने दडपशाहीचे धोरण अवलंबुन १८ शेतकऱ्यांवर अप क्र. ५४ / २०२४ नुसार गुन्ह्याची नोंद केली.तरीही शेतकरी घाबरले नाही.शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्याम मस्के पाटलांनी २६ फेब्रुवारी पासुन उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. दिवसेंदिवस मिळणाऱ्या आंदोलनाच्या समर्थनाला प्रशासन घाबरले याची दखल घेवुन विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनीही भेट देवुन दोन दिवसात मागण्या मान्य करण्याची प्रशासनाला विनंती केली.शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने १० एमव्हीके चे अतिरीक्त फिडर शंकरपुर पॉवर स्टेशन ला लावुन दिले.त्यानंतर काल उर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनी आजपासुन १२ तास सुरळित विजपुरवठा करण्यात येत असल्याची घोषणा केली. हे सर्व शेतकऱ्यानी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याचे फलित असुन यात काही राजकिय नेते तथा सत्ताधारी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करित आहेत.हे योग्य नाही.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांचे संघटन नेहमीच तत्परतेने काम करेल; अशी माहिती शेतकरी नेते रामदास मसराम यांनी दिली. या आंदोलनात कृषी केंन्द्र संचालकांनी व इतर संघटनांनीही पाठिंबा दिला. त्या सर्वांचेही आभार मानले.या प्रसंगी उपोषनकर्ते श्याम मस्के पाटिल,परसराम टिकले,विलास बन्सोड, कमलेश बारस्कर,प्रमोद पत्रे,शामकांत शेन्डे,गोपाल नाकाडे,शेखर कुथे,चित्तरंजन नाकाडे,लिलाधर पर्वते, प्रशांत किलनाके,परसराम ठाकरे,शुभम नागपुरकर, होमराज गायकवाड यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

