Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजशेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी....-कोंढाळा गावातील शेतकरी चिंताग्रस्त…

शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी….-कोंढाळा गावातील शेतकरी चिंताग्रस्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- यंदाच्या परिस्थितीत शेतकरी बांधव शेतातील धान पिकांच्या बाबतीत मोठ्या आशेवर होते.धान पीक पाहून अमुक व्यक्तीला एवढे धान होणार; तमुक व्यक्तीला तेवढे धान होणार; मात्र कृत्रिमरीत्या आलेल्या पुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरले आहे.कारण की साहेब वा मॅडम येतो व वर-वर पाहून निघून जातो.त्यांना ‘ना सुतक ना बारसा ‘असे असल्याने कोंढाळा गावातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर २०२३ रोजी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली होती. अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटरवर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले होते.

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक जरी नष्ट झाले नसले तरी गर्भाशयात आलेल्या धान पिकावर पुराच्या पाण्याचा मारा झाल्याने येणारे धानाचे लोंब काळपट व पांढरे येणार असल्याचे गावातील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.त्यानुसार येणाऱ्या धानाला कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतीचे पंचनामे होणार की नाही? तसेच नुकसान भरपाई मिळणार की नाही? अशी चिंता गावातील शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. अशातच ‘शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी’ व साहेब म्हणतो आम्ही आता गाणार गाणी’ असे होऊन चालणार नाही तर नुकसाभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधवांकडून जोर धरू लागली आहे.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!