Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरविजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असतांना झाडाखाली थांबू नका..! - तरुण शेतकऱ्याचा विजांच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असतांना झाडाखाली थांबू नका..! – तरुण शेतकऱ्याचा विजांच्या थयथयाटात सापडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आत्ताच्या वातावरणीय बदलाचे काही खरे नाही.झटक्यातच कडक ऊन तापू लागते,तर काही वेळातच काळोख पसरून आभाळ फाटू लागतो. त्यातच उन्हाळ्याचा पावसाळा तर पावसाळ्याचा उन्हाळा झाल्यासारखे वाटते.अश्यातच आता ऐन उन्हाळ्यातच अवकाळी पाऊस कोसळून ऊन पावसाचा जोर कायम आहे.अवकाळी पडणाऱ्या पावसात विजांचे कडकडाटांनी भर घातली आहे.शेतात वा इतर ठिकाणी कामे करीत असतांनाच अचानकपणे पाऊस हजेरी लावतो आणि एखाद्याचा बळी घेऊन निघून जातो.असाच प्रकार काल, सोमवारी लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात दुपारच्या सुमारास उघडकीस आला होता.आठ मजूर शेतातील मान्सून पूर्व मशागतीची व इतर कामे करीत असतांनाच अचानकपणे पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आठही मजूर शिवारातील एका झाडाच्या आडोशाला गेले असता झाडावर वीज कोसळली.यात झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.त्यातच नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील बाबदेव येथील निवासी तरुण शेतकऱ्याचा विजांच्या थयथयाटात सापडून बळी गेला.मनोज चिंधु वंजारी वय ३० वर्षे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.अरोली गावात त्यांची शेती आहे.काल सोमवारी त्यांच्या शेतात नांगरणी सुरू होती.दुपारी ४ वाजतादरम्यान वातावरणाचे चित्र बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. मनोज झाडाखाली ठेवलेल्या ट्रॅक्टरवर बसला होता.विजांच्या गर्जनाने खाली उतरत असतांनाच झाडावर वीज कोसळली व त्यात मनोज वंजारी मृत्युमुखी पडला.मनोजला पत्नी,दोन वर्षाची मुलगी व आई वडील आहेत.कर्त्या तरुण मुलाच्या मृत्युने कुटुंबावर संकट कोसळले आहे.
सहसा वीज ही झाडावर कोसळत असल्याचे घडलेल्या घटनांवर लक्षात येते.त्यामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यास झाडाचा आसरा न घेता एखाद्या सुरक्षित स्थळी थांबावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!