- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-लग्नापूर्वी काही जणांचे मित्र,मैत्रिणी, प्रियकर व इतर गोष्टी ह्या आता सर्वसामान्य झालेल्या आहेत. एकदा कां विवाह बंधनात अडकले तर पूर्वी घडलेल्या गोष्टींवर पडदा टाकून संसाराचा गाडा चालविणे आवश्यक आहे.मात्र,काहीजण इतरांच्या स्वप्नांना भंग करू पाहतात.अश्याच प्रकारे नुकतेच मागील महिन्याच्या १० एप्रिल २०२५ ला विवाह बंधनात अडकलेल्या नवविवाहितेचा पूर्वी प्रियकर असलेला माथेफिरू तरुण लग्न झाल्यानंतरही मागे लागला आणि लग्नापूर्वीचे सोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून विवाहितेची बदनामी केली.तो इतक्यावरच थांबला नाही,तर त्याने विवाहितेच्या वडिलाला व तिच्या पतीला तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठविले व एक दोन-वेळा नव्हे,तर तब्बल १२ मोबाईल क्रमांकांवरून वारंवार फोन करून तिचे लग्न तोडण्यासंदर्भात धमकी दिली. प्रकरणी आरोपी हतनाराम राठोड वय २५ वर्षे, रा.बोरोडा,ता.जि.सिरोही, राजस्थान याचेवर तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१,(२),३५६, (२),७८ सहकलम ६७ (ए) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लग्नापूर्वी २४ वर्षीय तरुणीची ओळख आरोपी हतनाराम राठोड याच्या सोबत इन्स्टाग्रामवर झाली होती.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यामुळे एकमेकांचे फोटो शेअर करणे व इतर बाबी घडू लागल्या.अश्यातच तरुणीचे लग्न आमगाव तालुक्यातील शिवणी येथील एका तरुणासोबत १० एप्रिल २०२५ रोजी रीतीरिवाजाप्रमाणे झाले.त्यामुळे आरोपी हतनाराम राठोड हा लग्न झाल्यापासून त्रास देऊ लागला.अश्यातच आरोपीने नवविवाहितेच्या माहेरच्या नावाने आयडी तयार करून प्रोफाइलवर तिचा फोटो लावला व सासरकडील तसेच माहेरच्याकडील लोकांना तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठवून ते व्हायरल करून तिची बदनामी केली.इतकेच नव्हे तर तिच्या पतीला व तिच्या वडिलांना फोन करून लग्न तोडण्याची धमकी दिली.प्रकरणी तक्रारीवरून आमगाव पोलिसांत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- Advertisement -

