Saturday, April 18, 2026
Homeगोंदियालग्न झाल्यानंतरही मागे लागला अन् शेवटी गुन्हाच दाखल झाला..!

लग्न झाल्यानंतरही मागे लागला अन् शेवटी गुन्हाच दाखल झाला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-लग्नापूर्वी काही जणांचे मित्र,मैत्रिणी, प्रियकर व इतर गोष्टी ह्या आता सर्वसामान्य झालेल्या आहेत. एकदा कां विवाह बंधनात अडकले तर पूर्वी घडलेल्या गोष्टींवर पडदा टाकून संसाराचा गाडा चालविणे आवश्यक आहे.मात्र,काहीजण इतरांच्या स्वप्नांना भंग करू पाहतात.अश्याच प्रकारे नुकतेच मागील महिन्याच्या १० एप्रिल २०२५ ला विवाह बंधनात अडकलेल्या नवविवाहितेचा पूर्वी प्रियकर असलेला माथेफिरू तरुण लग्न झाल्यानंतरही मागे लागला आणि लग्नापूर्वीचे सोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून विवाहितेची बदनामी केली.तो इतक्यावरच थांबला नाही,तर त्याने विवाहितेच्या वडिलाला व तिच्या पतीला तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठविले व एक दोन-वेळा नव्हे,तर तब्बल १२ मोबाईल क्रमांकांवरून वारंवार फोन करून तिचे लग्न तोडण्यासंदर्भात धमकी दिली. प्रकरणी आरोपी हतनाराम राठोड वय २५ वर्षे, रा.बोरोडा,ता.जि.सिरोही, राजस्थान याचेवर तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१,(२),३५६, (२),७८ सहकलम ६७ (ए) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लग्नापूर्वी २४ वर्षीय तरुणीची ओळख आरोपी हतनाराम राठोड याच्या सोबत इन्स्टाग्रामवर झाली होती.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यामुळे एकमेकांचे फोटो शेअर करणे व इतर बाबी घडू लागल्या.अश्यातच तरुणीचे लग्न आमगाव तालुक्यातील शिवणी येथील एका तरुणासोबत १० एप्रिल २०२५ रोजी रीतीरिवाजाप्रमाणे झाले.त्यामुळे आरोपी हतनाराम राठोड हा लग्न झाल्यापासून त्रास देऊ लागला.अश्यातच आरोपीने नवविवाहितेच्या माहेरच्या नावाने आयडी तयार करून प्रोफाइलवर तिचा फोटो लावला व सासरकडील तसेच माहेरच्याकडील लोकांना तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठवून ते व्हायरल करून तिची बदनामी केली.इतकेच नव्हे तर तिच्या पतीला व तिच्या वडिलांना फोन करून लग्न तोडण्याची धमकी दिली.प्रकरणी तक्रारीवरून आमगाव पोलिसांत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!