- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात अवकाळीमुळे पिकांसोबतच घरांची पडझड झाली आहे.काही ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाली आहे.तर,गारपिटीमुळे पिके भूईसपाट झाली आहेत.अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असतांनाही अवकाळी वादळी पाऊस अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत.कित्तेक ठिकाणी
शेतात कापून ठेवलेल्या आणि कापणीला आलेल्या धानात पावसाचे पाणी शिरल्यामुळे धानाला कोंब फुटले.काही शेतकऱ्यांनी धानाची मळणी केली असता पावसाने धान भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गावातील शेतकरी मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सिंचन प्रकल्प आणि विहिरींतील पंपाच्या पाण्याच्या भरवशावर मोठ्या प्रमाणात यंदा रबी हंगामात धान पिकाची पेरणी करण्यात आली.कृषी विभागाने रबी हंगामातील पेरणीचा अंदाज बांधला, त्यापेक्षा जास्त क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. लागवड करण्यात आलेली धानपीक कापणीला वेग आले आहे.तर काही ठिकाणी पंधरवाड्यात धान कापणीला येणार आहे.परंतु,विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.पण अवकाळीमुळे शेतकरी धान कापण्यास विलंब करीत आहेत.काही भागात उभे असलेले धानपीक वादळामुळे खाली लोळायला लागली आहेत.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन डोक्यावर हात मारत आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ संकटे ओढवली जात आहेत.
- Advertisement -

