Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस; मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न..

अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस; मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात अवकाळीमुळे पिकांसोबतच घरांची पडझड झाली आहे.काही ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाली आहे.तर,गारपिटीमुळे पिके भूईसपाट झाली आहेत.अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असतांनाही अवकाळी वादळी पाऊस अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत.कित्तेक ठिकाणी
शेतात कापून ठेवलेल्या आणि कापणीला आलेल्या धानात पावसाचे पाणी शिरल्यामुळे धानाला कोंब फुटले.काही शेतकऱ्यांनी धानाची मळणी केली असता पावसाने धान भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गावातील शेतकरी मुख्य रस्त्यांवर धान पसरवून सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सिंचन प्रकल्प आणि विहिरींतील पंपाच्या पाण्याच्या भरवशावर मोठ्या प्रमाणात यंदा रबी हंगामात धान पिकाची पेरणी करण्यात आली.कृषी विभागाने रबी हंगामातील पेरणीचा अंदाज बांधला, त्यापेक्षा जास्त क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली.  लागवड करण्यात आलेली धानपीक कापणीला वेग आले आहे.तर काही ठिकाणी पंधरवाड्यात धान कापणीला येणार आहे.परंतु,विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.पण अवकाळीमुळे शेतकरी धान कापण्यास विलंब करीत आहेत.काही भागात उभे असलेले धानपीक वादळामुळे खाली लोळायला लागली आहेत.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन डोक्यावर हात मारत आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ संकटे ओढवली जात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ताडोबात रेस्क्यू सेंटर बांधकामाच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वर्चस्व असलेल्या छोटा मटकाची मागील वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला 'ब्रम्हा' वाघाशी झुंज झाली होती.या संघर्षात...

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!