- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या काही भागातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाघांचा मुक्तसंचार वाढलेला दिसून येतो.जंगलातील वन्य प्राणी संपुष्टात येऊ लागले की, भुकेने व्याकूळ झालेल्या वाघांचा हल्ला मनुष्यावर होऊ लागला आहे.अशातच जनावरे चारण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने जंगलात फरफटत नेत ठार केले असल्याची घटना काल,२६ ऑगस्टला दुपारी २ वाजताच्या सुमारास सावली तालुक्याच्या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द)उपवन परिक्षेत्रातील उपरी वन बिटातील डोनाळा जंगल परिसरात घडली.आनंद वासेकर वय ५० वर्षे रा.डोनाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे शेतकरी आनंद वासेकर हे गावातीलच चिंदुजी नैताम व किशोर सोनटक्के यांच्यासोबत गुरे चराईसाठी गेले.गुरे चारत असताना वाघाने अचानक आनंद वासेकर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जंगलात फरफटत नेले.हे दृश्य बघून त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही व्यक्तींनी आरडाओरड करीत गावाकडे धाव घेतली आणि गावात या घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती गावात मिळताच गावकरी जंगलाच्या दिशेने धावून गेले.याची माहिती वनविभागाला व सावली पोलिसांना देण्यात आली. वनविभागाने त्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळापासून एक किमी अंतरावर आनंद वासेकर यांचा मृतदेह मिळाला.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे,उपवन परिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी,बीट वनरक्षक सोनेकर,महादेव मुंडे,वनरक्षक आखाडे,मेश्राम व वनकर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

