उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केला.ही घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रं.५२३ मध्ये गुरूवारी घडली,रात्री झाल्यानंतरही घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केला असता शुक्रवारला सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.सुभाष कडपे वय ४० वर्षे रा.जानाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील सुभाष कडपे हा शेतीच्या कामानिमित्त शेतावर गेला होता. दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना कक्ष क्रं.५२३ मध्ये घडली.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केले असता शुक्रवारला सकाळच्या दरम्यान त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी मूल पोलिसांना दिली.मूल पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती.

