- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-अनेक ठिकाणी रेतीघाट लिलाव झाले नसल्याने सर्वत्र रेतीचा तुटवडा जाणवत आहे. पावसाळ्यात रेतीला सोन्याचा भाव मिळत असतो. अशातच चोरीची रेती वापरल्याशिवाय अनेकांना पर्याय नाही.त्यामुळे रेती चोरांशी हातमिळवणी करून कमी-जास्त दरात रेती खरेदी केली जाते.त्यातच रेती नदीतील असो वा वनविभाग हद्दीतील असो; याचे कुणालाही देणे-घेणे नसते.असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा वनक्षेत्रात उघडकीस आला आहे.
रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करत असताना वनविभागाने शनिवारी राजुरा वनक्षेत्रातील नाल्यावर धाड टाकून चार ट्रॅक्टर जप्त केले.याप्रकरणी ११ आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या रेतीला मोठी मागणी असल्याने काही ट्रॅक्टरचालक विना परवानगी रात्रीच्या दरम्यान वनक्षेत्रातील नाल्यातून रेती तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारावर उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,उपविभागीय वनाधिकारी पवनकुमार जोंग यांनी विशेष मोहीम राबवून राजुरा, रामपूर,सुमठाणा या नियतक्षेत्रातून अवैधरित्या रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकांसह एकूण ११ आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, वनरक्षक संदीप तोडासे,पवन मदुलवार,सुनील गजलवार,पवन देशमुख,मारोती चापले,वनमजुर गंगाधर भेडारे मयूर आत्राम,निखिल खोब्रागडे,नरेश निखाडे,चालक मंगल पंचभाई,जीवन कावडे यांनी केली.
- Advertisement -

