Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजरात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार....- जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून...

रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार….- जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीची तस्करी…- तस्करांनी गावातील नागरिकांची उडवली झोप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्कर रात्रीच्या अंधारचा व शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत ढेक-ढेक ट्रॅक्टरचा आवाज करीत सुसाट वेगाने गावातील मुख्य रस्त्यावरील व इतर चोरट्या मार्गाने वाहने पळवित गावातील नागरिकांची झोप उडवीली आहे.अशातच ‘रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ आणखी किती दिवस सुरू राहणार आहे.यांवर आवर घालणार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्याच्या घडीला सगळीकडेच अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे.शासन स्तरावरून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कितीही कठोर पावले उचलली जात असली तरीही रेती चोरटे याला न जुमानता आपलीच मनमानी करून झटपट श्रीमंतीच्या नादात अवैध रेती चोरी करण्याकडे वळलेली दिसून येत आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीचा उपसा रात्री १२ ते १ वाजे पासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.शासकीय कार्यालयांना तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांचा फायदा रेती चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे. सुट्ट्यांमुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असल्याचे कळते.काही शासकीय कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने याचाच फायदा रेती तस्कर घेतांना दिसून येत आहेत.

हल्ली रेतीचा तुटवडा अनेकांना जाणवत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत.रेती चोरट्यांची यामुळे चांदीच-चांदी पहावयास मिळते आहे.अंतर ठरवून रेतीचे दर ठरविले जात आहेत.एक ब्रास रेतीसाठी ३ हजार ते ५ हजार रुपये सर्वसामान्य नागरिकांना मोजावे लागत आहे.यामुळे रेती तस्करांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी झाली आहे. शासनाच्या उदासीन धोणामुळे अनेक रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली गेली आहे.त्यामुळेच अवैध रेती तस्करी फोफावली असल्याचे सगळीकडेच चित्र निर्माण झाले आहे.मात्र यामधे सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी केली जाते आहे.’रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ कधी बंद होणार व अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर आळा घातला जाणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!