Thursday, April 16, 2026
Homeचंद्रपूररागाच्या भरात १६ वर्षीय विद्यार्थ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या... - दारू,सिगारेटचे जडले...

रागाच्या भरात १६ वर्षीय विद्यार्थ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या… – दारू,सिगारेटचे जडले होते व्यसन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने घरच्यांचा राग मनात धरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदनखेडा येथे काल,शुक्रवार २४ जानेवारीला उघडकीस आली. अरोहण माणिक बागेसर वय १६ वर्षे रा.चंदनखेडा, ता.भद्रावती असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
अरोहण हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता.प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतांना त्याला दारू व सिगारेटचे व्यसन लागले होते.त्यामुळे तो नियमित संस्थेत जात नव्हता. घरच्यांनी हटकले असता रागावून अरोहण हा २२ जानेवारीला घरून निघून गेला होता.घरच्या लोकांनी २३ जानेवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली.अशातच काल,शुक्रवारी २४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सरकारी दवाखान्याजवळील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला.प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास भद्रावती पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!