Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयंदा धान झाले खरी; पण पडून आहेत घरी.. - धान खरेदीचे उद्दिष्ट...

यंदा धान झाले खरी; पण पडून आहेत घरी.. – धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवा नं राजे हो..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात यंदा धानाचे विक्रमी उत्पादन झाले असून,सध्या मंजूर असलेल्या लक्षांकापेक्षा अधिक धान विक्रीसाठी उपलब्ध आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना आधारभूत किंमतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याला दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.मात्र,अजून पावेतो केंद्र सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने “यंदा धान झाले खरी; पण पडून आहेत घरी” अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी २०२५-२६ च्या हंगामाकरिता १०.४५ लाख मेट्रिक टन धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते.त्यापैकी आतापर्यंत सुमारे ८.२० लाख मेट्रिक टन धान खरेदी पूर्ण झाली आहे,जे एकूण लक्षांकाच्या जवळपास ७८.५० टक्के आहे.अनुकूल हवामान आणि लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने यंदा विविध ठिकाणी धानाचे मोठे उत्पादन झाले आहे.सध्या केंद्राने दिलेले उद्दिष्ट संपत आले असले तरी, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी अद्याप मोठ्या प्रमाणात धान शिल्लक आहे.३१ मार्च २०२६ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून,उर्वरित काळात राज्यात अतिरिक्त १० लाख मेट्रिक टन धान आवक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्यातच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या धानाची खरेदी वेळेत न झाल्यास त्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे.ही पिळवणूक थांबवण्यासाठी राज्याला अतिरिक्त धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवून देणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता, त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळावे,यासाठी केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्राचे धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे,अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!