Sunday, April 19, 2026
Homeनागपूरमोबाईल मागण्यावरून राग; आठवीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास.. - उद्याला होते आत्याच्या मुलीचे...

मोबाईल मागण्यावरून राग; आठवीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास.. – उद्याला होते आत्याच्या मुलीचे लग्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-दोन दिवसांनी आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने आठव्या वर्गात शिक्षण घेणारी दिव्या आणि तिचे आई-वडील तसेच कुटुंबीय दिव्याच्या आत्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते.दिव्याच्या आत्याचे घर हे
तिच्या घरापासून काही अंतरावर आहे.दिव्याने संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुटुंबीयांना मोबाईल मागितला.मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली आणि रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ घरी गेली.घरी कुणीच नसल्याने तिने घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सावनेर तालुक्याच्या चनकापूर येथील जय भोले नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी घडली. दिव्या सुरेश कोठारे वय १३ वर्षे, रा.वॉर्ड क्रमांक-६, हनुमान नगर,चनकापूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती चनकापूर येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील महात्मा फुले शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत होती.महवाचे म्हणजे,उद्या,सोमवार २४ नोव्हेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न होते. मात्र,क्षुल्लकशा कारणाने लग्नाचा आनंद क्षणात दुःखद घटनेत बदलून गेला.मृतक दिव्या ही बऱ्याच दिवसांपासून मोबाईलचा अतिवापर करत असल्याने काही दिवसांपूर्वी तिच्या काकांनी मोबाईल कमी वापर, अभ्यासाकडे लक्ष दे,असे सांगितले होते.घटनेने आई-वडील तसेच नातलगांना मोठा मानसिक धक्का बसला असून कोठारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!