- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-दोन दिवसांनी आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने आठव्या वर्गात शिक्षण घेणारी दिव्या आणि तिचे आई-वडील तसेच कुटुंबीय दिव्याच्या आत्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते.दिव्याच्या आत्याचे घर हे
तिच्या घरापासून काही अंतरावर आहे.दिव्याने संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुटुंबीयांना मोबाईल मागितला.मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली आणि रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ घरी गेली.घरी कुणीच नसल्याने तिने घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सावनेर तालुक्याच्या चनकापूर येथील जय भोले नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी घडली. दिव्या सुरेश कोठारे वय १३ वर्षे, रा.वॉर्ड क्रमांक-६, हनुमान नगर,चनकापूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती चनकापूर येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील महात्मा फुले शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत होती.महवाचे म्हणजे,उद्या,सोमवार २४ नोव्हेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न होते. मात्र,क्षुल्लकशा कारणाने लग्नाचा आनंद क्षणात दुःखद घटनेत बदलून गेला.मृतक दिव्या ही बऱ्याच दिवसांपासून मोबाईलचा अतिवापर करत असल्याने काही दिवसांपूर्वी तिच्या काकांनी मोबाईल कमी वापर, अभ्यासाकडे लक्ष दे,असे सांगितले होते.घटनेने आई-वडील तसेच नातलगांना मोठा मानसिक धक्का बसला असून कोठारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

