- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-कामात हयगय करणे,पदाचा गैरवापर करणे, वित्तीय अनियमितता करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात झोपी जाणे आदी तक्रारींचा पाढा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेला आणि चौकशी अंती आरोप सिद्ध होताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी सावली तालुक्याच्या चकपिरंजी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे यांना निलंबित केले आहे.विशेष म्हणजे,प्रफुल्ल निरूडवार यांनी ग्रामसेवकाची तक्रार केली होती.निलंबन काळात खोब्रागडे यांना वरोरा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.
ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे यांच्या बाबतीत तक्रारींचा पाऊस पडला होता.त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तत्कालीन गट विकास अधिकारी व विद्यमान गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे,चौकशी सुरू असतांना सहकार्य न करणे व चौकशी अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या.प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी खोब्रागडे यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे.कारवाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
- Advertisement -

