- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने यात १९ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,रविवार १५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील वनखी(वासाळा)गावाजवळ घडली.मंथन प्रकाश लाकडे रा.चामोर्शी (माल) ता. आरमोरी असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,मंथन हा काल रविवारी सकाळच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या ठाणेगाव येथील दूध डेअरीवर घरच्या पशुधनांचे काढलेले दूध देण्यासाठी गेला होता. अशातच डेअरीवर दूध देऊन दुचाकीने चामोर्शी (माल)या आपल्या गावाकडे परत येत असतांना वनखी(वासाळा)ते चामोर्शी (माल)डांबरी मार्गावरील रामदास खेवले यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या तीनचाकी मालवाहू रिक्षाने मंथनच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली.जबर धडक देतातच मंथन खाली कोसळला,त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक देवराव शंकर साळुंखे, नेहरूनगर,चंद्रपूर याच्या विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीनचाकी मालवाहू रिक्षा
पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
- Advertisement -

