Saturday, August 1, 2026
Homeभंडाराभरदिवसा चोरी; महिला ओरडत राहिली अन् चोरटे क्षणात दिसेनासे झाले..

भरदिवसा चोरी; महिला ओरडत राहिली अन् चोरटे क्षणात दिसेनासे झाले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पर्स हिसकावून पोबारा केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. महिला ओरडत राहिली अन् चोरटे क्षणात दिसेनासे झाल्याची घटना १२ जानेवारी रोजी तुमसर शहराच्या गोवर्धननगर भागातील दुर्गा मंदिरासमोरील गल्लीत घडली.अनिता चामट वय ४५ वर्षे,रा.इंदिरानगर ता.तुमसर,जि.भंडारा असे फिर्यादी महिलेचे नाव असून त्या सोमवारी दुपारच्या सुमारास शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या होत्या.त्यांनी आपल्या बँक खात्यातून ५० हजार रुपयांची रोकड काढली आणि त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. यादरम्यान,गोवर्धन नगरमधील दुर्गा मंदिर समोरील गल्लीतून जात असतांना,अचानक आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पैशांची पर्स हिसकावून वेगाने पळ काढला.अचानक घडलेल्या प्रसंगाने त्या काहीकाळ गोंधळून गेल्या.आरडाओरड करेपर्यंत चोरटे क्षणात नजरेआड झाले.घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.प्रकरणी तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून बँकेपासून ते घटनास्थळापर्यंतच्या मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!