- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-कालव्याच्या पुलावरून पायी जात असतांनाच अचानक पाय घसरला आणि आईने हात पकडुन ठेवलेला पाच वर्षीय चीमुकलाही पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात पडल्याची घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी शिवारात काल मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळपर्यंत त्या दोघांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयाचा डावा कालवा माहुली,पटगोवारी मार्गे रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात जातो.त्यात पाणी सोडण्यात आल्याने तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दोघेही वाहून आई सह मुलगाही वाहून गेला.अल्का शेखर बिहुने वय २८ वर्षे व अरमान शेखर बिहुने वय ५ वर्षे दोघेही रा.पटगोवारी,ता.रामटेक,जि.नागपूर अशी वाहून गेलेल्या आई व मुलाचे नाव आहे.
अल्का तिच्या मुलाला घेऊन काल मंगळवारी दुपारी पटगोवारी चिचभुवन पारशिवनी मार्गावरील पुलावर गेली होती.या परिसरात काही मजूर काम करीत होते.त्यानंतर ती मुलाला घेऊन पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या कालव्याच्या रस्त्याने पायी जायला निघाली,असे प्रत्यक्ष दर्शिंनी बघितले.या पुलापासून किमान पाचशे मीटर अंतरावर तिचा पाय घसरला आणि दोघेही कालव्यात पडले.कालव्यातील पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने दोघेही रामटेक तालुक्याच्या दिशेने वाहत गेले.माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठाणेदार राजेशकुमार थोरात,हवालदार पृथ्वीराज चव्हाण,मुद्दसर जमाल, देवा उकेबोंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही शोध सुरू केला.सायंकाळपर्यंत ते कुठेही आढळून आले नाहीत. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून आज,बुधवार १३ ऑगस्ट रोजी पुन्हा शोधकार्य राबविण्यात येत आहे.
- Advertisement -

