- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-पाण्याची टाकी सफाई करण्यासाठी टाकीत उतरलेल्या ५ कामगारांपैकी चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ९ मार्चला दुपारच्या सुमारास मुंबईतील नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये उघडकीस आली.हसीपाल शेख वय १९ वर्षे,राजा शेख वय २० वर्षे,झियाउल्ला शेख वय ३६ वर्ष,इमांडू शेख वय ३८ वर्षे अशी मृत झालेल्या कामगारांची नावे आहेत तर पुरहान शेख वय ३१ वर्षे याची प्रकृती बरी आहे.
माहितीनुसार,मुंबईच्या जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीत भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीत हे पाच जण उतरले होते.टाकीतील साफसफाई करत असतांना त्यांचा श्वास कोंडल्या गेला.त्यामुळे पाचही जण बेशुद्ध पडले.सदरची घटना काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी अग्निशमन विभागास माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना पाण्याच्या टाकीमधून बाहेर काढण्यात आले.त्यानंतर लगेच त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती चार जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती स्थिर आहे.
- Advertisement -

