- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दिष्ट अपुरे पडल्याने सुमारे ४० टक्के धान खरेदी केंद्रांवर उघड्यावर पडले आहे.ही समस्या केवळ भंडारा जिल्ह्याचीच नाही,तर संपूर्ण विदर्भाची आहे.गडचिरोली,गोंदिया,चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीही आहे.त्यामुळे,धान खरेदीचे उद्दिष्ट तात्काळ वाढवावे आणि बोनस जाहीर करावा,शेतकऱ्यांचे संपूर्ण चुकारे विनाविलंब बँक खात्यात जमा करावेत,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना दिलासा द्यावा,आदी मागण्यांसंदर्भात शुक्रवारी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी आणि धान खरेदी केंद्र चालकांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.प्रसंगी मागण्यांसाठी प्रशासनाला आठवडाभराचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रोखले जातील,पणन कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना कुलूप लावले जाईल आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.त्यामुळे,काही ठिकाणी नुसते पत्र व्यवहार करून आज होईल उद्या होईल म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -

