- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-विदर्भातील काही जिल्ह्यात शुक्रवार ८ ऑगस्ट आणि काल,शनिवार ९ ऑगस्ट रोजी विविध भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. पाऊस बरसला खरी,पण बऱ्याच ठिकाणी अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतावर वा इतर ठिकाणी कामांसाठी गेलेल्या नागरिकांची काहीकाळ तारांबळ उडाली होती.अश्यातच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात विजेमुळे एका महिलेस दृष्टी गमवावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे.शेतात काम करत असतांनाच महिलेच्या समोरच वीज कोसळल्याने तिने डोळे मिटले.डोळे उघडुन बघताच तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावच्या शेतशिवारात काल शनिवारी घडली.यात खैरलांजी येथील ४८ वर्षीय प्रमिला मुकेश पुसाम या महिलेने विजेच्या कडाक्याने दृष्टी गमवावी लागली आहे.प्रमिला पुसाम या घरी असलेल्या गुरांना चारा आणण्यासाठी शेतावर गेल्या होत्या.चारा कापत असतांनाच दुपारच्या सुमारास अचानकपणे पावसाने हजेरी लावली.पाऊस बरसत असतांनाच प्रमिला यांच्या नजरे समोरच धाडकन वीज कडाडली.त्यामुळे घाबरलेल्या प्रमिला यांनी डोळे मिटले व नंतर डोळे उघडुन बघताच क्षणात दिसेनासे झाले आणि डोळ्यापुढे अंधार दाटला.लागलीच प्रमिला यांनी आरडाओरड केली.ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली आणि लगेच तिला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या स्थितीत प्रमिला यांचेवर रुग्णालयात उपचार सुरू असून विजेमुळे क्षणात दृष्टी गमावण्याची वेळ आल्याने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.
- Advertisement -

