Saturday, May 2, 2026
Homeभंडाराधान घोटाळ्यातील तीन आरोपी कारागृहात; आठ आरोपी फरार

धान घोटाळ्यातील तीन आरोपी कारागृहात; आठ आरोपी फरार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा:- तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या आधारभूत धान खरेदी केंद्रात चार कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.जिल्हा पणन अधिकारी भारात पाटील यांच्या तक्रारीवरून संस्थेच्या अध्यक्षासह १२ जणांवर गोबरवाही ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अनुप शरद बोरकर,संचालक टिकाराम अनंताराम वासनिक आणि ग्रेडर विजय तेजराम वाघाडे यांना अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने जामिन नामंजूर करत त्यांची न्यायालयीन कोठडीत भंडारा कारागृहात रवानगी केली.तर ठाकचंद आत्माराम मुंगुसमारे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला होता.आता आठ आरोपी पसार असून त्यात उपाध्यक्ष बळीराम प्रेमलाल पुष्पतोडे,संचालक तिलकराम गोविंदा कापगते,अनिल शामराव पुष्पतोडे,शालिकराम गौपाले, मुलचंद प्रभुदास राऊत, प्रमिलाबाई डुलिचंद पुष्पतोडे, रेणुकाबाई चेतन गौपाले,बी.एस. रहांगडाले यांचा समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!